रेंदाळ गायरानमधील सौर ऊर्जा प्रकल्पापूर्वी गावकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा ४ मार्चपासून……

सध्या अनेक भागातील विविध मागण्याची पूर्तता होत असल्याचे चित्र दिसत आहे. काही अनेक मागण्या पूर्ण होतात तर काही मागण्या अपूर्ण राहिल्या जातात. हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथील असाच एक मुद्दा सध्या जोर धरत आहे. रेंदाळ गायरान येथे सौर प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मात्र प्रकल्प राबविताना ग्रामस्थांनी गावच्या विकासाला गृहीत काही प्रमुख मागण्या ठेवल्या होत्या त्याचा पाठपुरावा लोकप्रतिनिधींनी केला नाही. या मागणीसाठी भाजप सरचिटणीस डॉ. सचिन मेथे यांनी २४ जानेवारी रोजी एकदिवसीय लक्षणिक उपोषण केले होते.

एकदिवसीय लक्षणिक उपोषणाला स्थगिती देताना आमदार अशोकराव माने यांनी या संदर्भात प्रकल्पाशी निगडित सर्वच अधिकाऱ्यांची, अप्पर तहसीलदार, शेतकऱ्यांची, ग्रामस्थांची यावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली पण अधिकाऱ्यांना कोणत्याच प्रश्नाची उत्तर देता आली नाहीत म्हणून जिल्हाअधिकारी, सौरऊर्जा प्रकल्प अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करण्याच्या सूचना ग्रामपंचायतला दिल्या. याबाबत पुन्हा बैठक बोलावली जाईल असे सांगितले होते.

पण गावच्या भल्यासाठी मागण्यांचा पूर्ततेसाठी अर्धवट बैठकीला दिलेल्या आश्वासनाकडे दुर्लक्ष होत असल्याने ४ मार्चपासून ग्रामपंचायतीच्या दारात आमरण उपोषण करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण पूर्वचे जिल्हा सरचिटणीस डॉ. सचिन मेथे यांनी दिला. या मागणीचे निवेदन महावितरण कोल्हापूर यांना दिले आहे.