हातकणंगले नगरपंचायतीने लोक संख्येच्या प्रमाणात पाणी योजनेचा विस्तार अजून झाला नाही. त्यामुळे नगरपंचायतीच्या निष्क्रय कारभारामुळे नागरिकांचा पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न सूट सुटेना. ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आल्याने सामाजीक कार्यकर्ते विजय चौगुले यांनी हातकणंगले नगरपंचायतीत अंघोळ करुन कडकडीत शब्दात निषेध केला. अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. जलवाहीनीचे लिकेज, उपसा यंत्रेणीचा बिघाड पाणी पट्टी, लाईट बील, पाणी शुद्धी करण व कर्मचारी खर्च अशा अनेक समस्या उद्धभवल्या आहेत यामुळे गावचा पाणी पुरवठा आठ-आठ दिवस बंद पडत आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाणी टंचाई तीव्रतेने भासत आहे. नगर पंचायतीकडे कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही. यामुळे पाण्यासाठी लोकांचे हाल होत असल्याने भावना तीव्र आहेत. गेल्या आठ दिवसापासून पाणी पुरवठा बंद होता. तो चालु केला मात्र संपूर्ण शहरात पाणी मिळाले नाही. यातूनच ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विजय चौगुले यांनी नगर पंचायतीच्या स्वच्छतागृहात जाऊन आंघोळ करून पाणी टंचाईच्या भावना मांडल्या. दलित वस्तीत येणाऱ्या काळात जर पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही. तर नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनाच ऑफिसमध्ये जाऊन आंघोळ घालून तीव्र आंदोलन छेडणार आहे, अश्या तीव्र शब्दात ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विजय चौगुले यांनी निषेध केला.