पलूस तालुक्यात शासनाने मंजूर केलेल्या अनुदानाला नियमांचे कारण देत अधिकाऱ्यांकडून नकार

बदलत्या वातावरणामुळे तसेच अवकाळी पावसामुळे अनेक द्राक्ष बागायतदारांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी हा खूपच हवालदिल देखील झाला आहे. अनेक संकटांचा सामना वेळोवेळी यांना करावा लागत आहे. द्राक्ष बागायतदारांचे खूपच या बदलत्या वातावरणामुळे नुकसान झाले.

चोहबाजूनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मंजूर केलेले अनुदान हे अनेक नियमांचे कारण देत पलूस तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांकडून नकार दिल्याने हे शेतकरी खूपच आर्थिक संकटात सापडलेले आहेत.या शेतकऱ्यांना दोन लाख चाळीस हजार रुपयांचे अनुदान मंजूर झालेले होते. शेतकऱ्यांनी अनुदानासाठी लागणारी कागदपत्रे देखील जमा केले आहेत. परंतु कृषी अधिकारी अनेक नियमांचे कारणे देत या अनुदानास नकार देत आहेत.

नागाठणे येथील बाजीराव माने, महादेव माने, सुरेश आनंदा पाटील, अरविंद साळुंखे, उत्तम जाधव, नागनाथ मांगलेकर यांना व पलूस येथील दोन द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाले.पावसापासून संरक्षण होण्यासाठी त्यांनी द्राक्ष बागांवरती लोखंड पोलने कागद घातलेला होता. त्यासाठी त्यांना एक ते पाच लाख यांना खर्च आलेला होता.

त्यासाठी कोणत्याही बँकेने यांना कर्ज दिलेले नव्हते. परंतु आम्हाला न सांगता कागद का घातला तसेच आम्ही सांगू तिथेच साहित्य खरेदी करावे लागेल असे सांगून हे अनुदान आता रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.