भारताचा प्रिन्स झाला कसोटी कर्णधार; कॅप्टन बनल्यानंतर शुभमन गिल काय म्हणाला ?

जूनमध्ये सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने शनिवारी, 24 मे रोजी संघाची घोषणा केली. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलची कसोटी कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. इंग्लंडच्या या दौऱ्यात टीम इंडिया 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर गिलची पहिली प्रतिक्रिया आली आहे. बीसीसीआयला दिलेल्या मुलाखतीत त्याने हृदयस्पर्शी गोष्ट सांगितली आहे.

शुभमन म्हणाला, “हे एका दशकाहून अधिक काळानंतर घडत आहे जेव्हा विराट कोहली, रोहित शर्मा किंवा आर. अश्विन यांच्यापैकी कोणीही कसोटी मालिकेचा भाग नाही.” तिन्ही दिग्गजांनी अलीकडेच कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. या मालिकेत 25 वर्षीय शुभमन गिलसाठी अनेक आव्हाने असतील, जरी त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत आणि अव्वल स्थानावर आहेत. पण क्रिकेटच्या या दीर्घ स्वरूपात तो किती यशस्वी होतो हे पाहणे बाकी आहे. कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर गिलने हे देखील मान्य केले की या पदामुळे त्याच्यावर मोठी जबाबदारी असेल.

“जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात करता तेव्हा प्रत्येकजण देशासाठी खेळण्याचे स्वप्न पाहतो. फक्त भारतासाठी क्रिकेट खेळणेच नाही तर दीर्घकाळ कसोटी क्रिकेट खेळणे हे एक स्वप्न असते. मला कसोटी संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे ही माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे. या पदासोबत एक मोठी जबाबदारी देखील येते.” बीसीसीआयने अद्याप मुलाखतीचा संपूर्ण व्हिडिओ शेअर केलेला नाही.

शुभमन हा भारताचा 37 व्या नंबरचा कर्णधार होता. सध्या शुभमनच्या नेतृत्वात गुजरातची कामगिरी चांगली दिसत आहे. गुजरात आयपीएल 2025मध्ये सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसले. आज गुजरात आणि चेन्नईमध्ये आयपीएलचा सामना असणार आहे. गुजरात सध्या गुणतालिकेत टेबल टॉपर आहेत. गुजरातकडे सध्या 18 पॉइंट्स आहेत आजचा सामना जिंकल्यात त्यांच्याकडे 20 पॉइंट्स होतील आणि त्यांना टेबल टॉपर राहण्याची संधी मिळेल.