जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची इस्लामपूर भाजपचे पोलिसांना निवेदन

सर्वजण हे २२ जानेवारीची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रभू श्रीराम यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून हिंदूधर्मियांच्या भावना दुखावल्याबद्दल राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी इस्लामपूर शहर भाजपच्यावतीने पोलिसांकडे करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आव्हाड यांनी जाणीवपूर्वक असे वादग्रस्त वक्तव्य करून सामाजिक शांततेचा भंग केली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करावी.

यावेळी कायदा व विधी सेलचे जिल्हा संयोजक अॅड. कौस्तुभ मिरजकर, अॅड. सुयोग पाटील, अॅड. अमोल मदन, संजय पोरवाल, पोपट पवार, प्रवीण परीट, संतोष कुबुरे, सर्जेराव जाधव, कृष्णा पवार, प्रमोद मोरे उपस्थित होते.