विट्यातील खुनीहल्ल्यात तरुणाचा अखेर मृत्यू….

प्रत्येक गावामध्ये काही ना काही कारणांवरून मारामारी ही होतच असते. अलीकडच्या काळामध्ये क्राईमच्या अनेक घटना घडत आहेत. छोट्या-मोठ्या कारणांवरून अनेकांचे प्राण देखील गेलेले आहेत. असाच एक प्रकार विटांमध्ये उघडकीस आला आहे.

रवींद्र धोंडीराम नलवडे वय 36 पंचलिंगनगर तालुका खानापूर या तरुणाचा मृत्यू झालेला आहे. रवींद्र नलवडे च्या शेतात ऊसतोड कामगारांची टोळी आलेली होती. ऊसतोड कामगारांची जनावरे ही प्रवीण नलवडे यांच्या उसाच्या पिकाचे नुकसान करत होती. प्रवीण नलवडे याने रवींद्र यास येथून कामगारांची ऊस तोडीची टोळी उचल असे सांगितले.

हे सांगत असतानाच या दोघांमध्ये वादावाद सुरू झाली. प्रवीण नलवडे, सागर नलवडे व दीपक नलवडे यांनी चिडून जीवे मारण्याच्या उद्देशाने रवींद्रच्या डोक्यात, कपाळ, हातावर दांडक्याने जखमी केले होते.

तर छबाताई मोहन नलवडे यांनी चप्पलने मारहाण केली. जखमी रवींद्रला मिरज उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी तिथून खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.पण त्याचा मृत्यू झाला. जितेंद्र राजेंद्र पवार यांच्या फिर्यादीवरून प्रवीण मोहन नलवडे, दीपक मोहन नलवडे, सागर विलास नलवडे आणि छबाताई मोहन नलवडे या संशयीतांवर विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.