सध्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष आपले मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात करू लागलेले आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून प्रतीक पाटील यांना संधी द्या ते विजयी होतील असे मत इचलकरंजी येथे राष्ट्रवादीतील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यासमोर व्यक्त केले आहे.
अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. जर निवडणुकीत जुने लोक उभे राहिले तर त्यांच्याबद्दलची लोकांची मते अगदी स्पष्ट शब्दात प्रमुखांनी व्यक्त केली आणि आमदार पाटील यांनी देखील समजावून घेतली. अनेक जणांनी अगदी उत्सुकतेने काही प्रश्नही उपस्थित केले आणि मतदारसंघाचा सगळा आढावा आमदार पाटील यांनी घेतला.
उद्योग व्यवसायातील मंदी, सरकारी कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे याबद्दल सामान्य नागरिक खूपच त्रस्त आहेत. इचलकरंजीत पाणी आजही आलेले नाही यासह अनेक प्रश्नावर लोकांनी आपली मते अगदी स्पष्ट शब्दात व्यक्त केली.