महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 28 फेब्रुवारीला या निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. अशात या निवडणुकीत राष्ट्रवादी सहभागी होणार नसल्याच्या चर्चा होत्या. त्यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वाशरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्याकडे राज्यसभा जागा लढवण्यासाठी संख्याबळ नाही. बहुमत नसल्याने निवडणूक लढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नाही, असं शरद पवार म्हणालेत. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यामुळे भाजप 3, शिवसेना शिंदे गट 1, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 आणि काँग्रेस 1 असे सहा उमेदवार राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे.
Related Posts
आनंदाचा शिधा वाटपाला आचार संहितेचा ब्रेक!
गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लोकांना गोडधोड देण्याची योजना राज्य सरकारकडून राबविण्यात येते. परंतु आता लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता…
NEET कौन्सिलिंगबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय…….
नीट (NEET) प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी NTAला नोटीस जारी केली आहे. परीक्षेची पवित्रता…
दहावी, बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर! कसं पहाल टाईम टेबल!
कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (सीआयसीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा १२ फेब्रुवारी…