विट्यात दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग! तीस लाखांचे नुकसान

सध्या प्रत्येक गावोगावी आपणाला अनेक प्रकारची दुकाने ही पाहायला मिळतातच. विट्यामध्ये असणाऱ्या एका पुस्तकांच्या गोडाऊनला भीषण आग आज लागलेली आहे आणि या आगीमध्ये जवळजवळ 30 लाखांचे नुकसान झालेले आहे.

ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.विट्यातील गांधी चौकामध्ये असणाऱ्या मयूर स्टेशनरी या दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग लागली. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला.

ही आग इतकी भीषण होती की, या आगीमध्ये पुस्तकांसह लाखो रुपयांचे साहित्य हे जळून खाक झालेले आहे. बाजारपेठेतील दुकान पेटल्याने परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली. ही आग विझवण्यासाठी नागरिकांसह अग्निशमन विभागांची मोठी यंत्रणा उपस्थित राहिलेली होती.