लग्नात निमंत्रणाशिवाय जेवण करणं महागात!

लगीनसराईला सुरुवात झाली आहे. आजूबाजूला एखादं लग्न असेल तर अनेकजण न बोलवताही उपस्थिती लावतात. वरपक्ष अथवा वधूपक्षाचं काही देणघेणं नसतानाही अनेक जण लग्नात येतात जेवण करतात अन् तिकडून कलटी मारतात. तुम्हाही अशी चूक करत असाल तर सावधान… कारण या छोट्या चुकीमुळे तुम्हाला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.  होय… एखाद्या कार्यक्रमाला आमंत्रण नसताना उपस्थिती लावल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो. इतकेच नाही तर दोन वर्ष तुरुंगात जावं लागू शकतं. गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये लग्नाला न बोलवता गेल्यामुळे दोन जणांना अटक करण्यात आले होते. 

जर तुम्ही लग्नसमारंभात आमंत्रणाशिवाय जाऊन जेवणावर ताव मारण्याचा विचार करत असाल तर थांबा.. अशी चूक तुम्हाला महागात पडू शकते. तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो. याबाबत वकील उज्ज्वल त्यागी यांनी सोशल मीडियावर माहिती दिली. त्यागी यांनी व्हिडीओत सांगितलेय की, जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमात न बोलवता जात असाल तर हा गुन्हा आहे. तुमच्यावर भादवि कलम 442 आणि 452 अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. यामध्ये दोन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो.  लग्नसमारंभात न बोलवता जाणं ट्रेसपासिंगचा प्रकार आहे. त्यागी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कमेंट्सचा पाऊस पडतोय.