महाराष्ट्रात मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस …

थंडी गायब झाली असून तापमानात मोठी वाढ झाली आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने सध्या काही राज्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत.

महाराष्ट्रावरही पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट ओढवलं आहे. शनिवारपासून पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.भारतीय हवामान खात्याच्या अंदाजनुसार, पुढील ५ दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची (Rain Alert) शक्यता आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा देखील अंदाज आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आलाय.

नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, तसेच कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये थंडी जोर वाढेल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. दरम्यान, वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे महाराष्ट्र उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, चंडीगड, लडाख आणि राजस्थानमध्ये सलग ५ दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.