शरद पवार यांच्यावर जहरी टीका!

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महायुतीतील घटक पक्षांच्या उपस्थितीमध्ये सांगलीच्या इस्लामपूरमध्ये आयोजीत केलेल्या शेतकरी कामगार परिषदेमध्ये सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली. शरद पवार हे महाभारतातील शकुनी मामाप्रमाणे कलियुगातील शकुनी मामा आहेत, अशी टीका सदाभाऊ यांनी केली आहे.

महाराष्ट्रात जो सध्या गोंधळ सुरु आहे, त्यामागं शरद पवार असल्याचे सांगत, तुतारी दोन वेळा वाजती, एकदा लक्ष्मीच्या पाऊलांनी नवरी यायला लागते तेंव्हा आणि दुसऱ्यांदा स्मशानभूमीकडे पाऊल चालायला लागली की तुतारी वाजते. यामुळे ही शेवटची घटका असून आता तुम्हाला तुतारी वाजवत जायचे आहे. कारण हे पाप तुमचे आहे.अशा शब्दात सदाभाऊ खोतांनी शरद पवारांना मिळालेल्या पक्ष चिन्हावरुन जहरी टीका केली.