रेंदाळ गावात विकास निधी …

रेंदाळ येथे जनसामान्यांच्या मनावर राज्य करणारी व्यक्ती म्हणून अशोकराव माने यांचा उल्लेख करावा लागेल. संपूर्ण हातकणंगले मतदारसंघांत विकास कामांचा झंझावात निर्माण करण्याची किमया त्यांनी साधली असून लोक त्यांना आपला माणूस म्हणून ओळखतात, अशा शब्दांत भाजपचे नेते महावीर गाट यांनी माने यांचा गौरव केला. यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ.सुप्रिया पाटील इंगळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
रेंदाळ येथे विकास कामांचा शुभारंभ करताना दलितमित्र अशोकराव माने, महावीर गाट व इतर मान्यवर.डॉ. अशोकराव माने यांच्या विशेष प्रयत्नातून शिंगारे गल्ली रेंदाळ येथे २५/१५ योजनेतील पाच लाख रुपयांच्या विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी अशोकराव माने म्हणाले, गावच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून गावचा विकास साधण्याची गरज आहे. सरकारकडे विविध विकास कामांसाठी भरपूर निधी शिल्लक आहे. रेंदाळ गावच्या विकासासाठी निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्नशीलअसल्याची ग्वाही देत अध्यक्ष विजय माळी व फैमुनिसा नायकवडे यांच्या पाठपुराव्याचे त्यांनी कौतुक केले.