अनिल भाऊ हे शिवसेना पक्षाचे पहिले सांगली जिल्ह्यातील पहिले आमदार. शिवसेना स्थापन झाल्यावर पहिला आमदारकीचा गुलाल मिळवून दिला. गार्डी गावचे सरपंच, खानापूर तालुक्याचे सभापती,1990,1999,2014,2019 असे चार वेळा त्यांनी आमदार म्हणून काम केले. यशवंतराव चव्हाण, वसंतराव दादा पाटील, संपतराव माने, यांच्यासोबत कारकीर्द सुरु केलेले हे नेते होते. भाऊंचा मूळ पिंड काँग्रेसचा.
पण बदलत्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून क्षमता असतानाही डावलले जात असल्याचे जाणवल्यावर त्यांनी 2014 साली शिवबंधन बांधले. सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचा पहिला आमदार ते ठरले. एरव्ही सांगली जिल्ह्यात धनुष्यबाण विजयी होणे कोणालाही शक्य नव्हते.पण विजय मिळवून त्यावेळेस त्यांनी उमेदवारी नाकारलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा आपली ताकद दाखवून दिली.भाऊंच्या मतदारसंघात शिवसेना ही नगण्य होती. पण भाऊंनी स्वतःच्या बळावर शिवसेनेचा भगवा फडकवला. सलग दोन वेळा ते शिवसेनेकडून विजयी झाले. शिवाय शिवसेना पक्षाचा पहिला पंचायत समिती सभापती त्यांनीच केला. त्यांच्यामुळे जिल्हा परिषदेत शिवसेना पक्षाचा उपाध्यक्ष झाला.
विधानसभा, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या तिन्ही ठिकाणी सांगली जिल्ह्यात शिवसेनेला यश मिळाले ते अनिल भाऊ यांच्यामुळेच. एरव्ही शिवसेना पक्षाच्या ताब्यात क्वचित दोन चार ठिकाणी ग्रामपंचायतीचे सरपंचपद असे मात्र अनिल भाऊ यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी शिवसेनेचे सरपंच झाले. सोसायटीत चेअरमन झाले. बाजार समितीत संचालक झाले. हे सर्व शिवसेना पक्षाला त्यांनी यश मिळवून दिले.ज्या वसंतराव दादा यांच्या जिल्ह्यात शिवसेना कधीही विजयी होतं नव्हती तिथून दोन वेळा विजयी झाल्याने मंत्रीपद मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती मात्र शिवसेनेने त्यांना डावलले.
क्षमता असल्यामुळे डावलल्यामुळे त्यांच्यातला बंडखोर नेता जागा झाला.त्यामुळे नंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला बिनशर्त पाठींबा दिला.मतदारसंघातील पाणीप्रश्न सोडवा अशी विनंती केली आणि सातत्याने त्यासाठी पाठपुरावा केला..अगदी त्यांच्या मृत्यूच्या अगोदर आठ दिवस ते मुख्यमंत्री महोदयांना भेटायला मोटार आणि नंतर बोटीमधून ते आरे दरे या गावी गेले होते. त्यांची तळमळ पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही गहिवरून गेले होते.आता विशाल पाटील यांच्या उमेदवारीवर गंडातर आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या विरोधातील सांगली जिल्ह्यातील हे दुसरे बंड आहे.