खानापूर घाटमाथ्यावर वाढला प्रचाराचा जोर…..

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे प्रचाराची धामधूम सुरु आहे. आपापल्या परीने प्रत्येक पक्ष कामाला लागलेला आहे. दौरे, सभा हे गावोगावी सुरु आहेत. अशातच गेल्या काही दिवसापासून शांत असणाऱ्या घाटमाथ्यावर लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. उमेदवार निश्चित झाल्यामुळे गावोगावी प्रचाराला जोर येऊ लागला आहे. तीनही प्रमुख उमेदवारांचे कार्यकर्ते खानापूर घाटमाथ्यावर गावोगावी आहेत.

त्यांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. समाज माध्यमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. या महिन्यात लग्नाचे मुहूर्त मोठ्या संख्येने आहेत. त्याचाही फायदा उठविला जात आहे. प्रत्येक लग्नाला उपस्थित राहून जनसंपर्काचा खटाटोप केला जात आहे. उमेदवारांनी केलेली कामे व जाहीरनामा लोकांपर्यंत पोहोचवण्याची स्पर्धा कार्यकर्त्यांमध्ये सुरूआहे.