ग्राहकांना बसणार वीज दरवाढीचा शॉक……

राज्यात उद्योग विश्वाला झटका बसणार आहे. सरकारने उद्योग जगताला मिळणाऱ्या विजेवरची सबसिडी बंद केली आहे. इतकंच नाही तर प्रति युनिट विजेचे दर दोन रुपयांनी वाढवण्यातही आले आहे.पूर्वी उद्योजकांना साडे नऊ रुपयांना प्रति युनिट दराने वीज मिळत होती.

आता यात दोन रुपयांनी वाढ होऊन साडे अकरा रुपयांनी ही वीज मिळणार आहे. या निर्णयाचा लघू व मध्यम उद्योजकांना फटका बसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. नव्या दरवाढीमुळे वीज 15 टक्क्यांनी महागली आहे.