इचलकरंजी महापालिकेच्या शाळांच्या दुरावस्थेला प्रशासनाचा भोंगळ कारभारच जबाबदार असल्याचा आरोप करत मराठी एकीकरण समितीने उपायुक्तांची भेट घेतली. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा त्याचा मूलभूत हक्क आहे आणि त्यांना तो मिळालाच पाहिजे.
यासाठी शाळांच्या दुरावस्थेच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्याची मागणी केली.निपक्षपणे कार्य करणार्या शिक्षक आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची चौकशी समिती नेमावी, शाळांची दुरुस्ती करावी, महापालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढेल यावर भर द्यावा अशा विविध मागण्याही केल्या.
१५ दिवसांत मागण्यांबाबत सकारात्मकता दिसून न आल्यास विद्यार्थ्यांसोबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. शिष्टमंडळात अमित कुंभार, दिग्विजय महाजन, प्रमोद पाटील, विनोद शेवाळे, गिरीश खरबडे उपस्थित होते.