इस्लामपूर न्यायालयाचा निर्णय! राज ठाकरे निर्दोष

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 16 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मनसेनं सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे 2008 साली केलेल्या आंदोलनाप्रकरणी दाखल गुन्ह्यातून राज ठाकरे यांनी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

इस्लामपूर न्यायालयाने याबाबतचा निकाल दिला. शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडी येथे 2008 मध्ये मनसेनं केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर न्यायालयात गेल्या 16 वर्षांपासून खटला सुरू होता.

शिराळा न्यायालयाने या प्रकरणी ठाकरेंना दोन वेळा अजामीनपात्र वॉरंटही बजावले होते. आता, तब्बल 16 वर्षानंतर या गुन्ह्यातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.