वैभवदादा पाटील यांना अश्रू अनावर! मतदारसंघ भावनिक

माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा केला गेला. या वाढदिवसानिमित्त खानापूर मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते, नागरिक, कर्मचारी, पदाधिकारी यांनी सदाशिवराव पाटील यांना शुभेच्छा दिल्या. त्यांचे पुत्र ॲड. वैभव पाटील यांना मात्र यावेळी अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

वैभव पाटील म्हणाले की, आगामी काही महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक आहे आणि माझ्याकडून जर कोणी दुखावले असेल असल्यास मी त्या कार्यकर्त्यांपर्यंत जाऊन त्यांची जाहीरपणे माफी मागणार आहे. सर्वांना सोबत घेऊन विधानसभेला सामोरे जाण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.

माझ्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्या तुम्ही सर्वांनी पदरात घेऊन मला सहकार्य करावे आणि भाऊ आपण फक्त आशीर्वाद द्यावा विधानसभाच नव्हे तर प्रत्येक लढाईसाठी आम्ही सज्ज आहोत. आषाढीला कधीही आजपर्यंत आपण पंढरपूरला गेलो नाही. कारण माझे विठ्ठल रखुमाई म्हणजेच सदाशिवभाऊ आणि आई हे दोघे घरातच आहेत.तुमचा फक्त आशीर्वाद राहू द्या. मग मी कोणतीही लढाई जिंकायला तयार आहे अशा भावना व्यक्त करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांना व्यासपीठावरच अश्रू अनावर झाले.