सिग्नल बसविण्याची खासदार धैर्यशील माने यांच्याकडे मागणी….

सध्या सगळीकडेच पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच अनेक शहरांमध्ये रस्त्यांची दुरावस्था देखील झालेली आपल्याला पाहायला मिळते. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे पाणी जागोजागी साठलेले आहे आणि त्यामुळे वाहनांच्या अपघातामध्ये वाढ झालेली देखील पाहायला मिळत आहे. कोल्हापूर, सांगली, मिरज, इचलकरंजी, पेठ वडगाव, कुंभोज या मार्गे एकाच वेळी वाहने येतात आणि अशावेळी अपघात सदृश्य परिस्थिती निर्माण होते.

खासदार धैर्यशील माने यांनी चालू बजेटमध्ये काहीतरी रक्कम घालायला लावून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा किंवा जागतिक बँकेकडून राज्य सरकारने कर्ज घेऊन तात्काळ येथे सिग्नल बसवावेत अशी मागणी सध्या नागरिकांमधून जोर देत आहे. हातकणंगले येथे बस स्थानकाच्या समोर तात्काळ सिग्नल बसवावेत मात्र ते कायमस्वरूपी चालू ठेवावेत अशी ही मागणी नागरिकांमधून होत आहे.