इचलकरंजीचा कर्नाटक राज्याशी संपर्क तुटण्याची शक्यता!

कर्नाटक-कागलकडे जाणाऱ्या मार्गावर यशोदा पुलाचे काम सुरू आहे, पण हे काम अपूर्ण आहे. त्यामुळे तीन फूट पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास पूल बांधकामालगत असलेला पर्यायी मार्ग बंद पडणार आहे. परिणामी, इचलकरंजीचा कर्नाटक राज्याशी संपर्क तुटण्याची शक्यता आहे. तसेच कागलकडे जाण्यासाठी वाहनधारकांना इंगळी-पटट्टकोडोली मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

पंचगंगा नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून, पाणी पात्राबाहेर पडले आहे. पावसाची संततधार कायम राहिल्यास पुढील काही तासांत जुना पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे .सध्या वरद विनायक मंदिरालगत पाणी आले आहे. त्यामुळे मंदिरातील दर्शन सुविधा बंद होण्याची शक्यता आहे.आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त सोमनाथ आढाव यांनी पंचगंगा नदीघाट परिसराला भेट देऊन संभाव्य पूरस्थितीची पाहणी केली.