जयंत पाटील यांची केंद्र सरकारवर जोरदार टीका!

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि विरोधकांमध्ये विविध प्रश्नांवर खडाजंगी पाहायला मिळत असून विरोधक सरकारला घेताना दिसून येत आहेत. दरम्यान बीड मधून जयंत पाटलांनी सरकारला चांगलंच सुनावलंय.
भारतातल्या कांद्याला मारायचं आणि पाकिस्तानच्या कांद्याला जिवंत करायचं हे केंद्राचं धोरण असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना महाराष्ट्रात राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.

लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळवल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी विधानसभेसाठी जोरदार तयारी करत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संघटनात्मक बांधणीवर भर दिलाय. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या मराठवाड्यासह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आढावा घेत आहेत. आज ते बीडमध्ये होते. विधानसभेसाठी जिल्ह्यातील तयारीचा रोड मॅप ठरवताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.