विधानसभा निवडणुकीआधी मिळणार आनंदाचा शिधा

गणेशोत्सवात राज्यातील 1 कोटी 70 लाख कुटुंबांना आनंदाचा शिधा  वाटला जाणार आहे. 7 सप्टेंबरला गणेशोत्सवाची सुरूवात असून ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं सर्व जनतेपर्यंत गणेशोत्सवात आनंदाचा शिधा पोहचविण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरु आहेत. 100 रूपयांत प्रत्येकी एक किलो रवा,साखर,चनाडाळ आणि खाद्यतेल लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी टेंडर प्रक्रियेला वेग आला आहे.