गणेशोत्सवात राज्यातील 1 कोटी 70 लाख कुटुंबांना आनंदाचा शिधा वाटला जाणार आहे. 7 सप्टेंबरला गणेशोत्सवाची सुरूवात असून ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं सर्व जनतेपर्यंत गणेशोत्सवात आनंदाचा शिधा पोहचविण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरु आहेत. 100 रूपयांत प्रत्येकी एक किलो रवा,साखर,चनाडाळ आणि खाद्यतेल लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी टेंडर प्रक्रियेला वेग आला आहे.
कांदा, टोमॅटो, लसूणपाठोपाठ खाद्यतेलानेही सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट बिघडवले आहे. एका महिन्यात खाद्यतेलाच्या किमती आठ टक्क्यांनी वाढल्या आहेत.अशा परिस्थितीत लोकांना मासिक…