खानापूर विधानसभा मतदारसंघात कुणाला मिळणार तिकीट?

सांगली जिल्ह्यातील हा एकमेव मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर निवडून आले होते. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त असून या जागेवर शिंदे गटाचाच दावा असणार आहे. अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांनाच या ठिकाणाहून तिकिट मिळण्याची शक्यता आहे. तर अजितदादा गटाचे नेते वैभव पाटील या ठिकाणाहून इच्छुक आहेत.

त्यांना जर महायुतीतून तिकीट मिळालं नाही तर ते वेगळा विचार करणार असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर या ठिकाणाहूनही इच्छुक आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा मोठा प्रभाव आहे. आगामी काळात खानापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये तिकीट कुणाला मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.