हातकणंगले तालुक्यातील मराठा बांधव जरांगे यांच्या शांतता फेरीत होणार मोठ्या संख्येने सहभागी….

सद्या मराठा आरक्षणासाठी सध्या मनोज जरांगे यांची शांतता रॅली सुरू आहे. या रॅलीची सुरुवात त्यांनी पश्चिम महाराष्ट्र सोलापूरमधून सुरू झालेली आहे. मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या ९ ऑगस्टला क्रांतीदिनी होणाऱ्या शांतता फेरीत मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय हातकणंगले तालुका सकल मराठा समाज समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

आरक्षणयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या कोल्हापूर येथे होणाऱ्या शांतता फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी दीपक कुन्नुरे, भाऊसाहेब फास्के, दयासागर मोरे, पंडित निंबाळकर, संतोष सावंत, रमेश पाटील, गजानन खोत, सुनील काटकर, दिलीप खोत, मेश घोरपडे, एल.बी.पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. अमित गर्जे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.