इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्यासाठी आमदार नितेश राणे यांचा सांगलीत जन आक्रोश मोर्चा!

सांगली (Sangli) जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर करावे, या मागणीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. इस्लामपूरचे ईश्वरपूर झालेच पाहिजे या मागणीसाठी तसेच बांगलादेश मध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात (Bangladesh Violence) भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला. यामध्ये लाखो हिंदू लोकांनी सहभाग घेतला.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव, भारत माता की जय, जय श्री राम अशा घोषणांनी परिसर दुमदूमुन गेला. संतप्त हिंदूंनी संपूर्ण जिल्हाभरात जन आक्रोश मोर्चा काढला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला.