गेल्या अनेक वर्षाच्या पाठपुराव्याचं तसेच कष्टाचे फळ मिळाले आहे. स्व. अनिलभाऊ बाबर यांच्या पाठपुराव्याला अखेरीस यश आलेले आहे. सर्व वंचित गावांना पाणी मिळण्याची भाऊंची शेवटची इच्छा पूर्ण होत आहे. स्व. अनिलभाऊ बाबर यांचा उठावातील सहभाग पाण्यासाठीच टेंभू सहाव्या टप्प्याच्या कामाच्या वर्क ऑर्डर निघाल्या.1993 94 पासून स्व. अनिलभाऊ बाबर यांनी टेंभू योजनेची मांडणी आणि तेव्हापासूनचा पाठपुरावा त्या योजनेचे अंतिम स्वरूप आज विटा मतदार संघात पाहायला मिळाले.
टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याची मंजुरी ही काही दिवसांपूर्वी झालेली होती. सहाव्या टप्प्याचे टेंडर प्रोसेस पूर्ण होऊन वर्क ऑर्डर निघालेले आहे. अशी माहिती मा. सुहासभैया बाबर यांनी दिलेली आहे. यामुळे अनेक वंचित गावांना पाणी मिळण्याची स्व. अनिलभाऊ बाबर यांची इच्छा होती ती आता पूर्ण होत आहे.
लवकरच मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत भूमिपूजन समारंभ आयोजित होणार आहे. विटा मतदार संघाच्या वतीने अनिल भाऊंच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने जनतेच्या वतीने मा. सुहासभैया बाबर यांनी महायुती सरकारचे आभार मानलेले आहेत.