काही ठिकाणीच्या जागांवर महायुतीतील (Mahayuti) तिन्ही पक्ष आग्रही आहेत. त्यामुळं जिथं मिटतच नसेल तिथं मैत्रीपूर्ण लढती झाल्या पाहिजेत, असं मोठं वक्तव्य, माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी केलं आहे. आपलेच कार्यकर्ते दुसऱ्याच्या दावणीला जाऊ द्यायचे नसतील तर मैत्रीपूर्ण लढती झाल्या पाहिजेत. महायुतीमध्ये सर्वांनी समसमान जागा लढल्या पाहिजेत. आमच्या वाट्याला जास्त जागा आल्या पाहिजेत, असा आमचा आग्रह असल्याचे खोतकर म्हणाले. सर्वच ठिकाणी एकमत होईल असं शक्य नाही.
अनेक जागांवरती तिन्ही पक्ष ओढातान करतील असेही अर्जुन खोतकर म्हणाले. आशा ठिकाणी विकोपाला न जाता मैत्रीपूर्ण लढती केल्या पाहिजेत असे खोतकर म्हणाले. एकमेकांच्या ताकती शिवाय कोणीच पुढे जाऊ शकणार नाही. एकट्याच्या बळावर सरकार आणणे ही आता इतिहास जमा गोष्ट झाली असल्याचं खोतकर म्हणाले. सरकार आणायचं असेल तर तिघांना समन्वयानेच पुढे जावे लागेल असं खोतकर म्हणाले.