खानापुरात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन….

खानापूर येथील संपतराव माने महाविद्यालयाच्या वतीने माजी आमदार संपतराव माने यांच्या पुण्यतिथी निमित्त सोमवार, दि. ३० सप्टेंबर रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी परिवर्तनाचा महामेरू संपतराव नाना, महिला अत्याचाराला जबाबदार कोण?

हे जीवन सुंदर आहे, रील्स तारक की मारक, आज शिवराय असते तर दुष्काळ आणि महापूर मानवनिर्मित की की निसर्गनिर्मित, कृषिप्रधान भारतात रोजच शेतकऱ्यांचे मरण, जळला गेला मोबाइल, विद्यार्थी पालक शिक्षक आधुनिक शिक्षण व्यवस्था आदी विषय ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आकर्षक रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य डॉ. जे. जी. मुलाणी यांनी केले आहे.