सध्या सर्वत्र विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आलेला पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता दोन चार दिवसात लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी विविध खात्यांचे प्रमुख व अधिकारी वर्गाला दिलेले आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी विविध कामांचे प्रस्ताव पाठविणे, विविध कामांना मंजुरी मिळवून घेणे, विविध कामांचे मक्तेदारांना वर्क ऑर्डर देणे आधी कामांना वेग आलेला पाहायला मिळत आहे. या सर्व कामामुळे अधिकारी, कर्मचारी वर्ग कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
Related Posts
लवकरच योगी आदित्यनाथ इचलकरंजीत…..
पश्चिम महाराष्ट्रातील हातकणंगले, कोल्हापूर आणि सांगली हे तीन लोकसभेचे मतदार संघ हे भाजपाच्या दृष्टीने अतिशय प्रतिष्ठेचे आहेत. त्यात सांगली आणि…
कबनूर ऊरूसानिमित्त विविध शर्यतींचे आयोजन
कबनूर येथील ग्रामदैवत जंदिसाहेब व ब्रॉनसाहेब उरुस समिती यांच्यावतीने उरुसानिमित्त गुरुवार ता. ४ एप्रिल रोजी सकाळी ८.०० वाजता लहान गट…
इचलकरंजी मतदारसंघांत प्रतिष्ठेच्या लढती!
विधानसभा निवडणुकीची मंगळवारी घोषणा झाली. २२ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष रणधुमाळीला प्रारंभ होत आहे. जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांतही राजकीय घडामोडींना वेग आला…