संजय विभुते पोहोचले संजय राऊत यांच्या भेटीला…….

आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे मुंबई येथील मैत्री या निवासस्थानी सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बरोबर बैठक झाली. त्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील खानापूर आटपाडी सांगली आणि मिरज या मतदारसंघाच्या बाबतीत शिवसेनेने दावा सोडू नये आणि हे तिन्ही मतदारसंघ शिवसेनेने लढावे अशी एकमुखाने मागणी करण्यात आली.

संजय राऊत यांनी यावेळी बोलताना या मतदारसंघाच्या बाबतीत चर्चा चालू आहे लवकरच निर्णय होईल आपणास सकारात्मक आहोत असे आश्वासन दिले. त्याचबरोबर जिल्ह्यातील मतदारसंघाच्या बाबतीत मित्रपक्षांनी अडवणुकीची भूमिका घेतली तर आपणही वेगळी भूमिका घ्यावी लागेल असे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने संजय राऊत यांच्यासमोर आपापली भूमिका मांडली.

राऊत साहेब यांनी स्वतंत्र प्रत्येक पदाधिकाऱ्यांना वेळ देत असताना मित्र पक्षाकडे आयात झालेल्या उमेदवारांच्या साठी निष्ठावंतांचा बळी देऊ नका भांडवलदारांच्या समोर गेल्या अनेक वर्ष शिवसेनेचा भगवा घेऊन लढणाऱ्या शिवसैनिकांच्या वर अन्याय होऊ देऊ नका अशी मागणी शिवसैनिकांच्याकडून करण्यात आली.