खानापूर आटपाडी मतदारसंघात सुहास भैया बाबर विरोधात वैभव पाटील

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय पटलावर जबरदस्त हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्यानुसार खानापूर आटपाडी मतदारसंघाबाबत वरिष्ठ पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत.एकीकडे महायुतीकडून सुहास भैया बाबर यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना सुहास बाबर यांना टक्कर देण्यासाठी वरिष्ठ आणि अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील यांचे नाव महाविकास आघाडीने जवळजवळ फायनल केले होते अशातच उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या राजेंद्र अण्णा देशमुख यांची देखील वरिष्ठ पातळीवरून मनधरणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

सदाशिवभाऊंचे तिकीट फायनल झाले असताना वरिष्ठ पातळीवर सुरू असणाऱ्या महत्त्वपूर्ण चर्चेदरम्यान सदाशिवभाऊ पाटील यांनी वैभव दादा या निवडणुकीत निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत वातावरण घुमविल्याचे सांगण्यात येत आहे. या चर्चेदरम्यान वैभव दादा पाटील यांनी गेल्या पाच वर्षात लोकांशी ठेवलेला संपर्क आणि निवडणुकीसाठी केलेली तयारी विचारात घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून वैभव दादा पाटील यांची उमेदवारी फायनल केली असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे. उद्या दुपारपर्यंत महाविकास आघाडीकडून याबाबत घोषणा होणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.