सुहास बाबरांनी दिला पाटील गटाला मोठा धक्का!

सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघांमध्ये जोरदार तयारी सुरू असलेली पाहायला मिळत आहेत. प्रत्येक पक्षांमधून जोरदार हालचाली सुरू देखील झालेल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर मतदारसंघातील राजकारण चांगलेच तापू लागले आहे. बाबर आणि पाटील गटाची गावागावात जोरदार यंत्रणा सुरू झाली आहे. देवीखिंडी येथील ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करून पाटील गटाला चांगलाच धक्का दिलेला आहे.

येथील शंकर काकासो निकम,अर्जुन पांडुरंग माने, बाळकृष्ण सुभाष शिंदे, नारायण रामचंद्र शिंदे, रामचंद्र मच्छिंद्र देवकर, संजय घाडगे, रेवण विष्णु शिंदे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. या प्रवेशानंतर सुहासभैया बाबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.