निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही विकासाचे मुद्देसमोर घेऊन गेलो. त्यामुळे सहाजिकच इचलकरंजी मतदारसंघातील सर्वच मतदारांनी आणि जनतेने विकासाच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे आता आमदार म्हणून आपली जबाबदारी वाढली,असून मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढे आपण गतीने कार्यशील राहू अशी प्रतिक्रिया राहुल आवाडे यांनी दिली.
विजयानंतर बोलताना राहुल आवाडे म्हणाले की, महायुती सरकारने लाडकी बहिणी योजनेसह विविध योजना राबवल्याने जिल्ह्यात तसेच राज्यात सर्वत्र महायुतीला मताधिक्य मिळाले आहे. आपल्या विजयामध्ये महायुतीचे सर्व स्थानिक पदाधिकारी आमदार प्रकाश आवाडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेशराव हळवणकर यांचे मोठे योगदान आहे. जनतेने आपल्यावर मोठा विश्वास दाखविल्याने संपूर्ण मतदारसंघातील प्रश्नांची सोडवणूक करू याशिवाय प्राधान्याने इचलकरंजी शहरातील पाणी प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, उद्योग व्यवसायाचा प्रश्न, महिला सुरक्षेवर उपाययोजना करून त्यांना स्वावलंबी बनवणे, पंचगंगा प्रदूषण मुक्ती, नर्सिंग तसेच मेडिकल कॉलेज सुरू करणे, व्यवसाय वृद्धी, अशा सर्वांगीण विकासात्मक कामाच्या पूर्ततेसाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे राहुल आवाडे यांनी सांगितले.