पावसाळ्यात आलेल्या महापूरामुळे इचलकरंजी अप्पर तहसिल व हातकणंगले तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करुन त्यांच्या अनुदानाची रक्कमही निचित करण्यात आलेली आहे. सदरची रक्कम तातडीने शेतकऱ्यांना मिळावी या संदर्भात आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर सदर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
हातकणंगले तालुक्यातील ९५१६ पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे. परंतु त्यापैकी इचलकरंजी अप्पर तहसिल क्षेत्रातील २३७ आणि हातकणंगले तालुक्यातील ९६३ शेतकऱ्यांनी आवश्यक केवायसी ची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे त्यांना अनुदान मिळण्यास अडचण येत आहे. जोपर्यंत केवायसी ची पूर्तता केली जाणार नाही तोपर्यंत अनुदानाची रक्कम मिळणार नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने आपली केवायसी ची पूर्तता करुन घ्यावी म्हणजे अनुदानाची रक्कम तातडीने त्यांच्या खात्यात वर्ग होईल.
यासाठी केवायसी पूर्तता करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. त्याचा लाभ घेऊन संबंधित शेतकऱ्यांनी महा ई सेवा, शाहू सुविधा केंद्र याठिकाणी तातडीने पूर्तता करुन अनुदान मि ळण्यात निर्माण झालेली तांत्रिक अडचण दूर करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन आमदार राहुल आवाडे यांनी केले आहे.