आटपाडी नगरपंचायत देशात एक नंबर आणण्यासाठी विकास कामे करणार; मा. वैभव पाटील

खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये मा. वैभव पाटील यांना पराजय पत्करावा लागला. त्यांनी आटपाडी येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केलेली होती. त्यावेळेस त्यांनी विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममुळे तोटा झाला तरीही जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न समजावून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी पुन्हा एकदा नव्या उमेदीने उभे राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांकडून लढविणार आहे. तसेच विटा नगरपरिषद नंबर एकवर आलेली आहे त्याच पद्धतीने आटपाडी नगरपंचायत देशात एक नंबर आणण्यासाठी सर्वांना एकत्र घेऊन विकास कामे करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

त्यांनी खानापूर आटपाडी मतदारसंघातील आगामी निवडणुकीला नव्या उमेदीने सामोरे जाणार आहे तसेच या मतदारसंघातील बरेच प्रश्न हे प्रलंबित असून आटपाडी नगरपंचायत होऊन सुद्धा विकासकामे त्या पद्धतीत झालेले नाहीत. जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न समजावून घेऊन न्याय देण्याचे काम करणार आहे तसेच जनतेला सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार असल्याची ग्वाही त्यांनी राष्ट्रवादीचे नेते वैभव पाटील यांनी दिली