महापालिकेवर भगवा झेंडा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी तयारीला लागण्याचे आदेश….

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी नंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागलेले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र पहायला मिळाले. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम ताई गोऱ्हे या प्रथमच इचलकरंजीत आलेल्या होत्या. या निमित्ताने त्यांनी शिवसेनेच्या इचलकरंजी येथील मातोश्री भवनात कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधला. लोकसभा निवडणुकीत रवींद्र माने यांनी रात्रीचा दिवस करून खासदार धैर्यशील माने यांना दुसऱ्यांदा संसदेत पाठवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी केलेले हे प्रयत्न कदापिही वाया जाणार नाहीत.

विधानसभेला त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिंदेसाहेबही आजही आग्रही होते. परंतु महायुतीच्या जागा वाटपात काही निर्णय हे कठोर घ्यावे लागले. यावेळी माने यांनी थांबण्याचा निर्णय घेत भाजप उमेदवारा ला भक्कम साथ दिली. याची दखल पक्षाने घेतलेली आहे. त्यामुळे शिवसैनिकांना काळजी करू नका रवींद्र माने यांचा लवकरच सन्मान होईल असे डॉ. गोऱ्हे यांनी आश्वासित केले. इचलकरंजी महापालिकेचा पहिला महापौर हा शिवसेनेचाच झाला पाहिजे आणि तो पूर्ण बहुमताने म्हणून आजच्या घडीपासून शिवसैनिकांनी जिल्हा शिवसेनाप्रमुख रवींद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेवर भगवा फडकण्यासाठी तयारीला लागावे असे आदेश डॉ. नीलम ताई गोऱ्हे यांनी शिवसैनिकांना केले.