राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या 41 पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले. शिवाजीराव पाटील आप्पा नागरी सहकारी पत संस्था आष्टा, सार्वजनिक वाचनालय व झुंझारराव पाटील युवा मंच यांच्या वतीने आयोजित लोकनेते राजाराम बापूंच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
लोकनेते राजारामबापूंनी शेतीला पाण्याची व्यवस्था व सहकाराचे पाठबळ देऊन सांगली जिल्हा सुजलाम सुफलाम केला. असे गौरवोद्गार माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य झुंझारराव पाटील यांनी यावेळी काढले. झुंझारराव पाटील पुढे म्हणाले, शिक्षणाशिवाय प्रगती नाही हे ओळखून बापूंनी कासेगाव शिक्षण संस्थेची स्थापना केली. स्कुल बोर्डाचे अध्यक्ष असताना बापूंनी १८० गावामध्ये ४७२ शाळा बांधल्या.
बापूंनी शेतीलाही महत्व दिले. शेतीला सिंचन व्यवस्था व सहकाराची जोड दिल्याशिवाय प्रगती नाही हे ओळखून बापूंनी अनेक सहकारी संस्थांची उभारणी केली. बापूंनी सामान्य लोकांशी संवाद साधून त्यांची सुखदुःखे जाणून घेतली म्हणूनच ते लोकप्रिय लोकनेते झाले. असेही ते म्हणाले.
याप्रसंगी चेअरमन अण्णासाहेब हालुडे, राजारामबापू कारखान्याचे संचालक बबन थोटे, माजी संचालक नारायण पाटील, अंकुश मदने, केशव माळी, संभाजी माळी, दिलीप नांद्रेकर, सचिव सुनील पाटील, अमित कदम, अमित वारे, अविनाश विरभद्रे, तुषार शिंदे, संचालक, पदाधिकारी उपस्थित होते.