खोतवाडी ग्रामपंचायतकडून दिव्यांगांना निधी देण्यास टाळाटाळ

हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी ग्रामपंचायतकडून दिव्यांग बांधवांचा निधी देण्यास अनेक वर्षापासून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शासन निर्णयानुसार दिव्यांगांना हक्काचा निधी म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीला दिव्यांगासाठी ग्रामपंचायतच्या निव्वळ उत्पन्नाच्या पाच टक्के निधीतून निधीच्या माध्यमातून खर्च करणे बंधनकारक असताना देखील तो निधी खर्च होत नसल्याने आणि दुर्दैव म्हणजे सगळ्यात दुर्बल घटक असलेल्या दिव्यांग बांधव यांच्यासाठी शासन निर्णयानुसार मिळत असलेला हक्काचा निधीदेखील देण्यास ग्रामपंचायत अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. मागील ३ ते ४ वर्षापासून दिव्यांगाना ग्रामपंचायतीने निधी दिला नसल्याने सदरचा निधी कोठे खर्च झाला असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासन निर्णयानुसार प्रत्येक गावातील दिव्यांगांचा सर्व्हे करून शासनाने त्यांची दखल घेऊन त्यांना योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी दिव्यांग बांधवातून होत आहे.