आमदार जयंत पाटील भाजपच्या संपर्कात ? भाजपमध्ये गेले तर कोणाला फायदा?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात एक जागा रिक्त असल्याचे सूचक विधान केल्यानंतर, महाविकास आघाडीतील एका मोठ्या नेत्याच्या भाजपमध्ये प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाली. जर जयंत पाटील भाजपमध्ये गेले, तर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. राष्ट्रवादीचे बालेकिल्ले असलेल्या सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्यात भाजपला मोठा फायदा होऊ शकतो. जयंत पाटील यांचा शेतकरी वर्गावर चांगला प्रभाव आहे, त्यामुळे भाजपला ग्रामीण भागात अधिक बळ मिळेल.