हातकणंगलेत अनियमित पाणी पुरवठा, जाब विचारायचा कोणाला ?

सध्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मग यामध्ये रस्ते, पाणी, वाहतूक, गुन्हेगारी याबाबतीत काही ना काही समस्या असतात. या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांमधून मागणी देखील केली जाते. पण अनेकवेळा याकडे दुर्लक्ष देखील होते. त्यामुळे या मागण्या पूर्ण होत नाहीत. सध्या अनेक भागात पाण्याचा प्रश्न खूपच असलेला पहायला मिळत आहे. पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटू लागतो. हातकणंगले शहरात सध्या अनियमित पाणी पुरवठा सुरु आहे. प्रशासकीय राजवट आल्यामुळे जाब विचारायचा कोणाला असा प्रश्न शहरवासियांना पडलेला आहे. प्रशासक विशाल पाटील यांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.