इचलकरंजीला नियमीत पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आयुक्त पल्लवी पाटील यांचे अधिकाऱ्यांना आदेश

इचलकरंजी शहराची पाणीटंचाई खूपच जगजाहीर आहे. पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागते. सतत लागणारी गळती यामुळे शहरवासीयांना पाच ते सात दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. इचलकरंजी शहरवासीयांना नियमितपणे पाणी पुरवठा करणेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करणेबाबत त्याचबरोबर पंचगंगा जॅकवेल पाणी उपसा केंद्र आणि जलशुद्धीकरण केंद्र या ठिकाणी वापरात असलेली यंत्रसामुग्री दुरुस्तीसाठी आवश्यकतेनुसार करावेत अशा आदेश आयुक्त पल्लवी पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला. 

कृष्णा पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला मजरेवाडी जॅकवेल नजीक गळती लागल्याने इचलकरंजी शहराचा पाणी उपसा खंडित झालेला आहे. त्यामुळे शहरामध्ये होत असलेल्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झालेला आहे. सदर बाब निदर्शनास आल्याने आयुक्त पल्लवी पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या समवेत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा जॅकवेल आणि जल शुद्धीकरण केंद्र या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.


यावेळी आयुक्त पल्लवी पाटील यांनी जॅकवेल आणि फिल्टर हाऊस मधील यंत्र सामुग्रीची माहिती घेऊन शहरवासीयांना नियमितपणे पाणी पुरवठा करणेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करणेबाबत त्याचबरोबर पंचगंगा जॅकवेल पाणी उपसा केंद्र आणि जलशुद्धीकरण केंद्र या ठिकाणी वापरात असलेली यंत्रसामुग्री दुरुस्तीसाठी आवश्यकतेनुसार याबाबतचे प्रस्ताव सुद्धा तातडीने सादर करणेचे आदेश कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे यांना दिले. यावेळी विद्युत अभियंता अभय शिरोलीकर,अभियंता बाजी कांबळे यांचे सह पाणी पुरवठा विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.