सध्या अनेक भागात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. पाण्यासाठी नागरिकांची वणवण होते. वाळवा तालुक्यातील कामेरी येथे यशवंत ग्लुकोजचे उपाध्यक्ष शहाजी पाटील यांचा नागरी सत्कार संपन्न झाला. कामेरी वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या माध्यमातून कामेरी परिसरातील साडेतीन हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येऊन या भागाची शेतीसाठीच्या पाण्याची गरज पूर्ण होईल, असा विश्वास माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी व्यक्त केला. अध्यक्षस्थानी स्वातंत्र्यसैनिक सज्जनराव पाटील होते. माजी मंत्री शिवजीराव नाईक म्हणाले, वाकुर्डे बुद्रुक योजना शेतक-यांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायिनी ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून कामेरी परिसरातील जवळपास साडेतीन हजार एकर क्षेत्र आलीताखाली येणार आहे.
यावेळी रणधीर नाईक म्हणाले, शहाजी पाटील यांचा कारखान्यातील कर्मचारी, संचालक ते उपाध्यक्ष असा त्यांचा प्रवास इतरांसाठी प्रेरणा देणारा ठरेल. यावेळी वीस गुंठ्यांत ६० टन ऊस उत्पादन घेणारे प्रकाश निंबाळकर यांच्यासह गुणवंतांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. यावेळी महेश पाटील, अशोक जाधव, पवन पाटील, सुनील पाटील, डॉ. रणजित पाटील, तानाजी माने, सुखदेव पाटील, उपसरपंच नंदूकाका पाटील, एम. के. जाधव, बंडाकाका पाटील, छगन पाटील, पोपट पाटील, भगवान शिंदे, सी. एच. पाटील उपस्थित होते.