सध्या अनेक भागात सऱ्हास अवैद्य धंदे सुरु आहेत. अनेक भागात खून, मारामारी या प्रकरणात दिवसेंदिवस वाढच होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक भागात तर अवैद्य धंदे राजेरोसपणे सुरु असल्याने तरुणाई याला जास्तीत जास्त बळी पडत आहे. इचलकरंजी शहरातही अवैद्य धंदे खूपच जोमात खुलेआम सुरु आहेत. इचलकरंजी शहरात मधल्या काळात बंद असलेला मटका पुन्हा सुरु झाला आहे. यामुळे टोळ्यांचे प्रस्थ वाढेल, असे भय लोकांत आहे.
पण, बेकायदशीर धंद्या विरुध्द कोणी बोलले, लिहिले किंवा आवाज उठविला तर शहरातील पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखलहोईल, अशी लोकांच्या मनात भिती आहे. वाढणाऱ्या गुन्हेगारीला खतपाणी घालणारा धंदा ४२ लाखांच्या सल्ल्याने सुरु आहे, असे लोक म्हणतात. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी मत देणाऱ्या मतदारातून व्यक्त होत आहे.