रेंदाळ येथे संत निरंकारी मंडळाच्यावतीने स्वच्छता मोहिम

रेंदाळ येथे संत निरंकारी मंडळाच्या सेवादल व भक्तांकडून ‘स्वच्छ जल स्वच्छ मन’ हा उपक्रम न राबविण्यात आला. संत निरंकारी मिशनची सेवा भावना आणि मानव कल्याणाचा संकल्प साकार करण्याच्या हेतूने माता न सुदीक्षा महाराज व निरंकारी राजपिता रमित यांच्या पावन ब आशिर्वादाने ‘अमृत प्रोजेक्ट’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात करण्यात आली. या अभियानांतर्गत रेंदाळ गाव तलाव, 7 दत्त मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली. ज्यामध्ये रेंदाळ, हुपरी, यळगुड, पट्टणकोडोली, तळंदगे फाटा (काळम्मावाडी वसाहत) येथील निरंकारी सेवादल, स्वयंसेवक व भाविक भक्तगणांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला.

संत निरंकारी मंडळाचे सचिव व समाजकल्याण प्रभारी श्री जोगिंदर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले की, देशभरात राबविलेल्या अमृत प्रोजेक्ट, परियोजनेच्या दरम्यान सर्व सुरक्षा नियमांचे पूर्णपणे पालन करण्यात आले. पर्यावरण सुरक्षा अंतर्गत जल संरक्षणामध्ये आपली सकारात्मक सक्रिय भूमिका निभावत ग्लोबल एनर्जी ॲन्ड एन्व्हायरमेंट फाऊंडेशन (जीईईएफ) ने संत निरंकारी फाऊंडेशनला (एसएनसीएफ) प्रतिष्ठीत वाटर कजर्लेशन इनिशिएटिव्ह एनजीओ ऑफ द ईयर २०२५ पुरस्कार देऊन गौरविले आहे.