स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक क्षमतेबरोबरच शारीरिक क्षमता व कौशल्यामध्ये वाढ होते. असे प्रतिपादन माजी आमदार अॅड. सदाशिवराव पाटील यांनी केले. ते येथील आदर्श कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सव उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अँड. सदाशिवराव पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये महाविद्यालयीन शिक्षणाचा कालखंड हा महत्वाचा असून मिळणाऱ्या ज्ञानाबरोबरच सर्वांगीण विकासाकरिता विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत भाग घेतल्यास नव चैतन्य निर्माण होत. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धामध्ये भाग घ्यावा.
या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम, व्हॉलिबॉल, थ्रो बॉल, क्रिकेट, खो-खो, गोळा फेक, भालाफेक या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एन. एस. महाजन यांनी केले. या स्पर्धेचे नियोजन प्राचार्य डॉ. एन. एस. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. पूजा धनवडे, प्रा. श्वेतांबरी शितोळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रतीक्षा जाधव यांनी केले. आभार वैष्णवी मोहिते यांनी मानले.