आटपाडी येथील जॉगवर सिटी येथे महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प बटरफ्लाय गार्डन या कामाचा शुभारंभ आटपाडी नगरपंचायत चे मुख्याधिकारी वैभव हजारे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी आटपाडी तालुक्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या बटरफ्लाय गार्डन हे केंद्र शासनाच्या सन २०२२ – २३ मधील भांडवली गुंतवणुकी करता राज्यांना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राज्य शासनास प्राप्त अर्थ सहाय्यमधून ४ कोठी ८ लाख रुपये निधी उपलब्ध झाला असून योजनेद्वारे आटपाडी नगरपंचायत हद्दीमधील जॉगवर सिटी या ठिकाणी बटर फ्लाय गार्डन व पोहोच रस्ते विकसित करण्यात येणार आहेत.
जवळपास २. ५ एकर क्षेत्रामध्ये वरील गार्डन विकसित करण्यात येणार आहे. यामध्ये प्रवेश प्लाझा, सुरक्षा दालन (सुक्युरिटी केबिन), बसण्याची जागा (सिटींग पवेलीयन) , म्पीथेअटर, पदपथ रस्ता (वॉकवे), बघण्याची जागा, कुंपण असलेली भिंत (कम्पाऊड बॉल विच फेन्स) बांधणे अशी कामे या निधीतून होणार आहेत. हे बटरफ्लाय गार्डन ९ ते १० महिन्यात होणार असुन ते पुणे-मुंबई सारख्या गार्डन सारख्या अनुभवाची प्रचिती या गार्डन मधून आटपाडी तालुक्यातील सर्व नागरिकांना अनुभवता येणार आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्याच्या सौंदर्यामध्ये हा प्रकल्प या गार्डन च्या माध्यमातून भर पाडणारा आहे.