आष्टा नगरपरिषदेच्यावतीने शहरातील बोळ व रस्त्याच्या कामाची फेरनिविदा काढण्यात आल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या लढ्याला यश मिळाले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वाळवा तालुका अध्यक्ष संग्राम जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. संग्राम जाधव म्हणाले, ‘आष्टा नगरपरिषदेच्या निविदा प्रक्रियेत प्रशासनाचा अनागोंदी कारभार पुढे आला. प्रशासकराजवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा अंकुश दिसत आहे. त्यांचा विविध कामात हस्तक्षेप होत आहे.
नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी रघुनाथ मोहिते यांच्याकडे निविदा प्रक्रिया ऑनलाइन राबवण्याची मागणी केली. ही मागणी मान्य झाली असून मुदतवाढ देऊन प्रक्रिया पारदर्शी राबविण्यात येत आहे. यावेळी राजारामबापू कारखान्याचे संचालक रघुनाथराव जाधव, संग्राम फडतरे, माणिक शेळके, समीर लतीफ, शिवाजी चोरमुले, सतीश माळी उपस्थित होते. माणिक शेळके म्हणाले, आष्टा शहरातील विकास कामाबाबत थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येणार आहे