हजारो भाविक सेवेकर्यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात इचलकरंजी नदी वेस नाका येथील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणित) येथे श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने दिवसभरात विविध आध्यत्मिक सेवा करण्यात आल्या. नदीवेस नाका येथील अध्यात्मिक केंद्रात सकाळी ८ वाजता भुपाळी आरतीने उत्सवाला प्रांरभ झाला. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मुर्तीवर शोडषोपचार अभिषेक केल्यानंतर हवनयुक्त श्रीस्वामी याग संपन्न झाला.१०.३० वाजता माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते नैवेद्य आरती झाली.
दिवसभरात श्री स्वामी समर्थ जप व श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीची वैयक्तीक सेवा करण्यात आली. सांयकाळी ६.३० वाजता शिवसेना जिल्हाप्रमुख सौ. व श्री रविंद्र माने यांच्या हस्ते झालेल्या आरतीनंतर सुमारे १५ हजार भाविक सेवेकर्यांनी मांदीयाळीचा (सामुदायीक सहभोजन) आंनद घेतला. श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास केंद्र (दिडोंरी प्रणित) नदीवेस नाका येथील सेवा केंद्रात महाराजांची त्रिकाळ आरती व मानवीय जीवनातील कोणत्याही समस्येवर ईश्वरीय सेवेतून विनामुल्य मार्गदर्शन अखंडीत चालू असून याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन सेवा केंद्राचे वतीने करण्यात आले आहे.