हातकणंगले तालुक्यातील पंचगंगा कारखान्याचा निवडणूक अधिकारी बदला; माजी चेअरमन रजनीताई मगदूम यांची मागणी

बेकायदेशीर आणि नियम धाब्यावर बसून निवडणूक घेतलेल्या जिल्हाधिकारी यांच्याकडे पुन्हा पंचगंगा कारखान्याच्या निवडणुकीची सूत्र सोपवली आहेत. त्यामुळे मागील अनुभव पाहता, निवडणूक प्रक्रिया कशी राबविली जाईल हे स्पष्ट आहे. त्यामुळे अन्य यंत्रणाकडे निवडणूक प्रक्रिया सोपवावी अशी मागणी पंचगंगा साखर कारखान्याच्या माजी चेअरमन रजनीताई मगदूम यांनी पत्रकार बैठकीत केली. या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याचे ही त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, पी.एम. पाटील यांनी निवडणूक यंत्रणेला हाताशी धरून त्यांना हवी तशी निवडणूक करून घेतली.

कायदा, नियमांची तोडफोड केली जे लोकसेला अपेक्षित नाही. त्या पद्धतीने प्रक्रिया राबवली गेली. त्यामुळे आमच्या गटाचे सर्व उमेदवारी अर्ज बाद झाले. परंतु सत्याला कुठेतरी न्याय असतो त्यामुळे ती झालेली बिनविरोध निवडणूक केंद्र सरकारने रद्द ठरवली हा आमचा पहिला विजय आहे. रत्नाप्पाण्णा कुंभार घटना समितीचे सदस्य होते. देशाची घटना तयार करताना त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि त्यांच्या नावाने असलेल्या कारखान्यात लोकशाहीचा गळा घोटण्यात आला हे पी.एम. पाटलांनी पाप केलेल आहे.

त्यामुळे या निवडणुकीत सभासद त्यांना नक्की धडा शिकवतील असा आमचा विश्वास आहे. पत्रकार बैठकीला शिवतीर्थ विकास समितीचे अध्यक्ष पुंडलिक जाधव, अण्णासाहेब शहापुरे, सुकुमार गडगे, रायगोंडा पाटील, बसगोंडा बिरादार, शरद कांबळे, बबन नाईक आदी उपस्थित होते.